Skip to main content

पाकळ्यांचे पंख लेउनी
उनाड उडती रानपऱ्या
खळखळ झऱ्यापरी हासती
फिरती जंगल डोंगर दऱ्या

रुक्ष वल्ली घन माजली
दाट गुंतली परस्परी
प्रसन्न पिवळे स्पर्शे ना
सूर्यकिरणही भूमीवरी

मनुष्याचा वावर नव्हता
नव्हते कसले प्रदूषण
दैवी पहा ती भूमी होती
होते सौम्य भाषण

शिष्ट नव्हते बोलणे की
भ्रष्ट नव्हते वागणे
इच्छिले ते सर्वही होते
नव्हते काही मागणे

झाली कत्तल बेसुमार
त्यांच्या वसतिस्थानाची
सिमेंटची जंगले उभी
झाली वर्दळ वाहनांची

तिथेच हासत शेवटी त्यांनी
कवटाळले मरण
मनुष्याने रचले पहा
रानपऱ्यांचे सरण


Comments

Popular posts from this blog

पडू दे भुरळ मनाला मोहू दे क्षणाक्षणाला.. तुझे मीपण अन माझे नाही आणि कुणाला सख्या रे बावरलेल्या रंग दे या मनाला .. साजणा स्पर्शून जा रे राजसा कणाकणाला सडा हा नक्षत्रांचा लागले मी पणाला .. मला पाकळ्यांत घे ना दूर सारुनी उन्हाला साजणा लिंपून जा रे आतुरल्या या तनाला
मज जाणवावे जे असे ते जाणिवेपल्याडले जेथ शब्दा नाद स्पर्श श्वास अन गंधाळले मज नेणिवेचा विसर नको अन जाणिवेची जाण हवी ऐहीकाची शाश्वताला जोडणारी नाळ हवी चिदाकारले चित्त हवे मज गलबलणारे मनही हवे विशुद्ध चैतन्याच्या बागा अवनीवरती मनू नवे सोंगाडी मी होऊ कसा अन मुखवट्यात मी राहू कसा सोंगाची मज सवय नको रे ओळख मजला मीच असा उरात कोरड नको उमाळे हृदयाहृदयी बंध हवे प्रेम विशुद्ध, नको आसक्ती आनंदाचे मार्ग नवे   
अर्पण केले ज्यांनी सुखाला स्वातंत्र्याच्या वेदीवरती प्राण ठेविले ज्यांनी त्यांची जाण चला ठेऊ रक्षण करण्या मातृभूमीचे झिजली ज्यांची काया तारुण्य उधळले ज्यांनी त्यांचे भान चला ठेऊ स्वातंत्र्याचा तरुवर ज्यांनी रक्तसिंचने जपला आयुष्य वेचिले ज्यांनी त्यांचे गुण चला गाऊ लौकिक राखण्या देशाचा लौकिक आपला सांडला देह समर्पिला ज्यांनी त्यांचा मान चला ठेऊ   स्वातंत्र्याचा विचार आणि विचाराच्या स्वातंत्र्याची बीजे पेरली ज्यांनी त्यांचे वाण हाती घेऊ