तारस्वरी गर्जल्या तुताऱ्या
शंख नादला आहे
सरसावा तलवारी भाले
झुंज वादळी आहे
कोण आरोळ्या मारिती
कुणी शस्त्र परजले आहे
शोक कुणी करताती कुणाला
प्रीत बाधली आहे
बाहू फुरफुरती कुणाचे
भूमी दणाणत आहे
कुठे दुर्बल हृदयाचा
थरकाप उडाला आहे
स्थैर्यकाळी बाजारबुणगे
खोगीरभरती आहे
युद्धकाळी धडकी भरली
त्यांच्या हृदयी आहे
युद्धाभूमिसी ठाकून म्हणती
याला पर्याय आहे
युद्ध नको ते म्हणती षंढ
शांती हवी आहे
.jpg)
Comments
Post a Comment