Skip to main content

 उमरठ माझा गाव
मर्द मराठा मावळा
वारकऱ्यांच्या हृदयी
विठू नांदतो सावळा

गावातल्या आयाबाया
संधिकाली त्या उठती
सडा,रांगोळी,दळण
ओव्या-भूपाळ्या म्हणती

गड्या झुंजूमुंजू झालं
भाकरी बांधू न्याहारीला
सर्जा-राजा बैलजोड
नांगर जोखड संगतीला

दिवेलागणीच्या वेळी
गप्पा शिळोप्याच्या दारी
सुख दु:ख वाटताती
कष्टकरी शेतकरी

ठसठशीत हे कुंकू
चुडा हिरवा ल्यायला
नऊवारी साडीमंदी
मुखडा चंद्राचा शोभला

पशु-पक्षी झुडुपे-झाडे
माझ्या गावी हिरवळ
 कशी आभाळमायेने
निळी पांघरली शाल

सूर्या शेलारमामा शूर
ताना प्रतापी नरवीर
नांदताती आमच्या गावी
अभिमान वाटे थोर

उमरठ माझा गाव
संस्कारांनी झळाळला
नाही कधी मर्यादांचा
उंबरठा ओलांडला


  

Comments

Popular posts from this blog

पडू दे भुरळ मनाला मोहू दे क्षणाक्षणाला.. तुझे मीपण अन माझे नाही आणि कुणाला सख्या रे बावरलेल्या रंग दे या मनाला .. साजणा स्पर्शून जा रे राजसा कणाकणाला सडा हा नक्षत्रांचा लागले मी पणाला .. मला पाकळ्यांत घे ना दूर सारुनी उन्हाला साजणा लिंपून जा रे आतुरल्या या तनाला
मज जाणवावे जे असे ते जाणिवेपल्याडले जेथ शब्दा नाद स्पर्श श्वास अन गंधाळले मज नेणिवेचा विसर नको अन जाणिवेची जाण हवी ऐहीकाची शाश्वताला जोडणारी नाळ हवी चिदाकारले चित्त हवे मज गलबलणारे मनही हवे विशुद्ध चैतन्याच्या बागा अवनीवरती मनू नवे सोंगाडी मी होऊ कसा अन मुखवट्यात मी राहू कसा सोंगाची मज सवय नको रे ओळख मजला मीच असा उरात कोरड नको उमाळे हृदयाहृदयी बंध हवे प्रेम विशुद्ध, नको आसक्ती आनंदाचे मार्ग नवे   
अर्पण केले ज्यांनी सुखाला स्वातंत्र्याच्या वेदीवरती प्राण ठेविले ज्यांनी त्यांची जाण चला ठेऊ रक्षण करण्या मातृभूमीचे झिजली ज्यांची काया तारुण्य उधळले ज्यांनी त्यांचे भान चला ठेऊ स्वातंत्र्याचा तरुवर ज्यांनी रक्तसिंचने जपला आयुष्य वेचिले ज्यांनी त्यांचे गुण चला गाऊ लौकिक राखण्या देशाचा लौकिक आपला सांडला देह समर्पिला ज्यांनी त्यांचा मान चला ठेऊ   स्वातंत्र्याचा विचार आणि विचाराच्या स्वातंत्र्याची बीजे पेरली ज्यांनी त्यांचे वाण हाती घेऊ